CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीकडे नेण्याचा प्रयत्न!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण अत्यंत चुकीची


मुंबई : गणेशोत्सव अधिक पारंपारिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. डीजेच्या विरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण अत्यंत अयोग्य असून, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. (CM Devendra Fadnavis)



विधानभवनात पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांना पुण्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारण्यात आला. डीजेच्या विरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशा पद्धतीने हल्ला करमे अजिबात योग्य नाही. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद होणे योग्य नाही. या प्रकरणावर बोलताना त्यांनी गणेशोत्सवाबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. आपला गणेशोत्सव हा पारंपारिक पद्धतीकडे नेला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, कदाचित पहिल्याच वर्षी शंभर टक्के यश मिळणार नाही, पण त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. (CM Devendra Fadnavis)



याशिवाय, पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी २४ तास काम करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी वर्षभर ही व्यवस्था सुरू राहणार असून, त्यासाठी एका समर्पित अधिकाऱ्याची (डेडिकेटेड ऑफिसर) नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. (CM Devendra Fadnavis)



दिशा सालियन प्रकरणावर भाष्य


बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे वर्ग केल्याच्या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आपली सखोल चौकशी पूर्ण करून न्यायालयात अहवाल सादर केला होता. मात्र, या तपासात काहीतरी तांत्रिक किंवा इतर बाबींची कमतरता असावी आणि त्यात आणखी काही सखोल तपास व्हावा, असे उच्च न्यायालयाला वाटले असावे. याच कारणातून न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे, यावर आता यापेक्षा अधिक काय बोलणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये पाच लाख हेक्टरवरील खरीप पिके संकटात, महिनाभरापासून पाऊस गायब

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची परीक्षा पाहिली आहे. अल्प पावसावर

Indian healthcare : ब्रिटनने भारताकडून शिकावे, एनएचएस अध्यक्षांकडून भारतीय आरोग्यव्यवस्थेचे कौतुक

नवी दिल्ली : आरोग्यसेवा व्यवस्थेच्या क्षेत्रात भारत आता जगासमोर एक आदर्श निर्माण करत आहे. इंग्लंडच्या

S Jaishankar : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारत मध्यस्थीस तयार; युक्रेन दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मोठे विधान

नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukrain) दरम्यान गेल्या काही काळापासून सुरू असलेला भीषण संघर्ष थांबवण्यासाठी भारत

Tibet Earthquake : तिबेटमध्ये रिश्टर स्केलवर ५.० तीव्रतेचा भूकंप

ल्हासा : तिबेटमध्ये गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 नोंदवण्यात

Royal Enfield : रॉयल एनफिल्ड फक्त बाईकच नाही, तर टी-शर्टपासून बूटांपर्यंत सर्व काही विकते; जाणून घ्या किंमती आणि कंपनीची कहाणी

मुंबई : रॉयल एनफिल्डच्या बाईक्स (Royal Enfield) त्यांच्या दमदार लूक आणि रॉयल अंदाजासाठी ओळखल्या जातात. मात्र, कंपनी केवळ

Nitesh Rane : २०२८ पासून मुंबई वॉटर मेट्रो सुरू होणार, पालघरपर्यंत विस्तार करण्याचे नियोजन; मंत्री नितेश राणे यांची माहिती

महाराष्ट्राने समुद्राकडे 'विकासाचे दालन' म्हणून पाहण्याची गरज  मुंबई : ८७७ किलोमीटरची किनारपट्टी, असंख्य नद्या