महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान राज्य संरक्षित स्मारक, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई: श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थानाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भुईकोट किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी केली. याबाबत सुधारित प्रस्तावाला सांस्कृतिक विभागाने मान्यता दिली असून, लवकरच शासन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.



भुईकोट किल्ल्याचा ऐतिहासिक तपशील, सीमा आणि क्षेत्रफळ आदी बाबींची पुनर्तपासणी करून सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाला सांस्कृतिक विभागाने मान्यता दिली आहे. राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थळाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन करणे, त्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आणि या इतिहासाची माहिती उपलब्ध करून देणे, या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात आली आहे, असे शेलार यांनी सांगितले.

सुधारित प्रस्तावाला सांस्कृतिक विभागाची मान्यता


महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाचा आणि ऐतिहासिक योगदानाचा गौरव करताना त्यांच्या जन्मभूमीचे जतन होणे आवश्यक आहे. भुईकोट किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याने या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इतिहासाशी संबंधित या महत्त्वाच्या स्थळाच्या संवर्धनाला चालना मिळणार आहे. तसेच, भविष्यात या परिसराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून विकास करण्यासही मदत होणार असल्याचे सांस्कृतिक विभागाकडून सांगण्यात आले.
Comments
Add Comment

ST Bus News: 'एसटी'कडून ५ हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकवाहिनीला मिळणार नवी ताकद

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ दाखल होण्याचा मार्ग

Central Railway : तिकीट मिळालं नाही म्हणून चिंता नको! कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या ४ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याची घोषणा

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी

Dahisar Bhayandar Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर-भाईंदर सागरी मार्गाचं काम वेगात; ४५ मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत

मुंबई : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी आणि उत्तर मुंबईतील प्रवास अधिक वेगवान करण्याच्या

Rajapur Accident : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या वाहनाचा राजापूरमध्ये भीषण अपघात; 10 जण जखमी

रत्नागिरी : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईहून कोकणातील गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाला रविवारी

Mumbai Bangalore Highway : मुंबई-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; 2 ठार, 12 जखमी

पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील जांभूळवाडी परिसरातील दरी पुलावर शनिवारी मध्यरात्री चार वाहनांचा भीषण अपघात

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी! ३८६ विशेष ट्रेन अन् मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा

मुंबई : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरातून लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या गावी रवाना झाले आहेत.