कुर्ली - घोणसरी धरणग्रस्तांना मिळणार जास्तीत जास्त मोबदला

कणकवली (प्रतिनिधी) : कुर्ली-घोणसरी धरणाच्या कालव्याचे प्रश्न आणि फोंडाघाट, घोणसरी,लोरे, वाघेरी पियाळी या गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत संबधित अधिकारी, शेतकरी यांची बैठक घेऊन चर्चा केली. भूसंपादनाचा मोबदला यापूर्वी जमीन मालकांना खूपच कमी दिला असून तो जास्तीत जास्त देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली. कालवा कॅनॉल पद्धतीने बनवावा, तो बंदिस्त पाइपलाइन पद्धतीचा नको यावर चर्चा झाली, तर २०१६ साली भूसंपादन न करताच शेतकऱ्यांच्या जमिनीतून कॅनॉल खोदण्यात आला, त्याचा मोबदला अद्यापही दिलेला नाही. तो योग्य मोबदलासुद्धा त्वरित द्यावा, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान जास्तीत जास्त मोबदला देण्याविषयीचा प्रस्ताव तयार करून त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे यावेळी ठरवण्यात आले.


सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या दालनात भाजपचे कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कुर्ली-घोणसरी धरणाच्या डाव्या तीर कालव्याची बैठक झाली. या बैठकीला पुनर्वसन अधिकारी श्रीमती सिंगाडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हर्षद यादव, कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, माजी सभापती तुळशीदास रावराणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे,आबू पटेल, सुनील लाड, पांचाळ, श्रीपादकर आदींसह फोंडा पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.


कुर्ली, घोणसरी धरणाच्या कालव्यात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. भूसंपादन योग्य पद्धतीने केले नाही. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. काही वर्षांपूर्वी भूसंपादन न करताच कालव्याची खोदाई करण्यात आली. त्याचाही मोबदला दिलेला नाही. पाईपलाईन पद्धतीने कालवा केला जाण्याची शक्यता असून त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. ओपन कॅनॉल तयार करून कालवा काढला जावा, असे यावेळी चर्चात सांगण्यात आले. अशा अनेक मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाल्यानंतर या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'भारताला महासत्ता बनवण्याच्या प्रवासात सिंधुदुर्गचे योगदान मोलाचे असेल'

स्वातंत्र्यदिनी १२५ क्षयरुग्णांना दत्तक घेत घालून दिला नवा आदर्श मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत आणि

Nitesh Rane : फळपीक विम्यातील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करा

- मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करा मुंबई :

Sindhudurg : प्रशासन प्रभावीरित्या राबवण्यासाठी AI वापरणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा, जाणून घ्या कसा केला AI चा वापर ?

मालवण : एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेकांना वाटतं की एआय हे बड्या

Sindhudurg News : देवगडच्या कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाहून मृत्यू

सिंधुदुर्ग : कोकणात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत सावध करणारी आणि मन हेलावून

MSRTC : कोकणातील स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी; मालवण ते थेट अक्कलकोट नवीन एसटी बससेवा सुरू!

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने कोकणातील स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अत्यंत

Nitesh Rane : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला चहा-भजीचा आस्वाद

मसूरे : सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या