तेजस्वी प्रकाशच्या ‘नागिन ६’ मध्ये ट्विस्ट

ऐकलंत का! : दीपक परब



छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नागिन ६’ मध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही प्रमुख भूमिका साकारत आहे. ‘नागिन ६’मध्ये लवकरच एक ट्विस्ट येणार आहे. या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत अभिनेता वत्सल सेठ याची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे तेजस्वीसोबत वत्सल सेठ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वत्सलने तीन वर्षांसाठी मालिकांमधून ब्रेक घेतला होता. त्याने ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेमध्ये निशांत माहेश्वरी ही भूमिका साकारली होती. त्याने ‘एक हसीना थी’, ‘हासील’ आणि ‘रिश्तो का सौदागर-बाजीगर’ यांसारख्या शोमध्ये प्रमुख भूमिका साकारली. ‘नागिन ६’ व्यतिरिक्त वत्सल सेठ आगामी शो ‘तितली’मध्येही दिसणार आहे. वत्सल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वत्सल आणि त्याची पत्नी इशिता यांच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वी वत्सलने त्याच्या पत्नीसाठी ग्रँड बेबी शॉवरचे आयोजन केले होते. वत्सल आणि इशिताचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते. इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांनी काही काळ डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्न केले. ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’ या टीव्ही शोमध्ये काम करताना इशिता आणि वत्सल यांची ओळख झाली होती.



‘नागिन’ या मालिकेच्या पाचव्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता वत्सल सेठची या मालिकेत एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षक या मालिकेच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत. नागिन-६ या मालिकेतील तेजस्वी प्रकाशच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तेजस्वीला बिग बॉस-१५ या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व