Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस ठरणार निर्णायक!

नवी दिल्ली : आशिया कप (asia cup) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातही भारत-पाकिस्तान सामन्याची सगळेच चाहते अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहे. रोहित शर्मा अँड कंपनी २ सप्टेंबरला त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहेत.


श्रीलंकेच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी कंबर कसून सज्ज आहेत. कँडीच्या मैदानावर या हाय वोल्टेज सामन्यात टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. हे आम्ही नव्हे तर पल्लिकल स्टेडियमचे आकडे सांगत आहेत.


आशिया कपआधी एकीकडे टीम इंडिया नेट्समध्ये सराव करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळ केला. यावरून दिसते की दोन्ही संघ एकदम तयारीनिशी या स्पर्धेत उतरणार आहेत. दरम्यान, दोन्ही संघादरम्यानच्या खेळामध्ये टॉस महत्त्वाचा ठरणार आहे.


कँडीच्या मैदानावर वनडे फॉरमॅटचा आकडा पाहिला तर पाठलाग कऱणाऱ्या संघाला मोठा फायदा मिळतो. या मैदानावर आतापर्यंत ३३ वनडे सामने खेळवण्यात आले. त्यात आधी पाठलाग करणाऱ्या संघाने १८ सामने जिंकले आहेत.


अनेकदा टॉस जिंकल्यानंतर कर्णधार पहिल्यांदा फलंदाजी करणे पसंत करतात. याच कारणामुळे सुरूवातीला पिच फलंदाजांच्या बाजूने असते. मात्र वेळेसोबतच ही पिच स्पिनर्सला मदत करण्यास सुरूवात करते. यामुळे रोहित शर्मा टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.