‘एक दोन तीन चार’मध्ये निपुण अन् वैदेही परशुरामीची हटके लव्हस्टोरी

ऐकलंत का!: दीपक परब


मराठी मनोरंजनसृष्टीसाठी २०२३ हे वर्ष खूपच कमाल होते. कोरोनानंतर प्रेक्षकांची पावले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्याचे काम मराठी मनोरंजनसृष्टीने केले. अनेक मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवले. आता पुढच्या वर्षाची सुरुवातदेखील मनोरंजनात्मक होणार आहे. नुकताच ‘एक दोन तीन चार’ या मराठी सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. एक नवीकोरी कथा असलेला ‘एक दोन तीन चार’ हा सिनेमा नवीन वर्षात ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या मल्टिस्टारकास्ट सिनेमासोबतच ‘एक दोन तीन चार’ या सिनेमाचा धमाकेदार टिजर रिलीज होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा डबल बोनस ठरणार हे नक्की. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मुरांबा’ या बहुचर्चित सिनेमानंतर वरुण नार्वेकर या दिग्दर्शकाचा हा पुढील सिनेमा असणार आहे, तर या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहे.


‘एक दोन तीन चार’ या सिनेमात दमदार कलाकारांची फौज असणार आहे. सिनेमातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी हिने केली आहे, तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीने साकारली आहे. याव्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर, यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. यानिमित्ताने वैदेही आणि निपुण ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, तर या सिनेमाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी एक मोठी मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे.


आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो, हे विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटांतील प्रेक्षकवर्गासाठी ही नववर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट ठरणार आहे.

Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व