आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरभरती नको, गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची मागणी

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे यांचे आदोलन वाशीमध्ये पोहोचले आहे. येथे झालेल्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वाशीमध्ये उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारकडे केलेल्या मागण्याची माहिती दिली.


जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न १०० टक्के निकाली निघत नाही तोपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती करून नये अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिक्षण मोफत द्या. तसेच सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र काढण्याचा आदेश द्यावा. यासोबतच आंतरवाली सराटीसह राज्यातील इतर ठिकाणचे गुन्हे मागे घेतल्याचे आदेश काढावेत अशी मागणी जरांगे यांनी सरकराकडे केली आहे.


तसेच आरक्षण मान्य झाल्याशिवाय सरकारने कोणत्याही प्रकारची शासकीय भरती करू नये मात्र भरती करायची असल्यास जागा राखीव ठेवण्यात याव्या असेही जरांगे यांनी सरकारला सांगितले. तसेच या मागण्यांसाठी सरकारने सहमती दर्शवल्याची माहितीही यावेळी जरांगेंनी दिली.


आज संध्याकाळपर्यंत शासनाचा निर्णय अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. जर सरकारकडून अध्यादेश निघाला नाही तर आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.



मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या


आंतरवाली तसेच राज्यातील इतर ठिकाणी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. तसेच समाजाच्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळत नाही तोवर १०० टक्के शिक्षण मोफत केले जावे अशी मागणीही यावेळी जरांगे यांच्याकडून करण्यात आली.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर