Jalgaon news : जळगावमध्ये तीव्र उष्णतेमुळे गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला!

तापमान ४४ अंश सेल्सियसवर गेल्याने घडली दुर्घटना


जळगाव : राज्यभरात सूर्य आग ओकत असून उन्हाचा तीव्र तडाखा (Intense heat) बसत आहे. काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत असल्या तरी उन्हाची समस्या कायम आहे. मराठवाड्यासह विदर्भात तर तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाणीटंचाईची समस्याही भेडसावत आहे. धुळे (Dhule), जळगावमध्ये (Jalgaon) उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. या जिल्ह्यांत तापमान ४४ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. यामुळेच जळगावमध्ये उन्हाच्या तडाख्याने एका ट्रकला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.


जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची मोठी लाट पसरली आहे. जळगावातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अचानक एका ट्रकने पेट घेतला. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती. या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले, मात्र अग्निशमनचे बंब येईपर्यंत ट्रकचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गव्हाच्या पोत्यांचेही नुकसान झाले आहे.


या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी दुपारच्या प्रहरात अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि