Reliance Jioच्या युजर्सना मोठा झटका

मुंबई: देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्रीपेड टॅरिफ प्लानच्या किंमतीत वाढीची घोषणा केली आहे. कंपनीचे नवे टेरिफ प्लान ३ जुलैपासून सुरू राहतील. कंपनीचा बेस प्लान आधी १५५ रूपयांचा होता जो वाढून आता १८९ रूपयांचा होईल. अशातच या दरात २२ टक्के वाढ झाली आहे.

रिलायन्स जिओने आपल्या १९ प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. यात १७ प्रीपेड आणि २ पोस्टपेड आहेत. येथे पहिल्यांदा जिओेने एअरटेलच्या आधी प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत.

Image

नव्या टॅरिफ प्लाननुसार आधी जे २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला महिन्याचा प्लान १५५ रूपयांचा होता त्यासाठी आता १८९ रूपये मोजावे लागणार आहेत. २०९ रूपयांच्या प्लानसाठी २४९ रूपये, २३९ रूपयांच्या प्लानसाठी २९९ रूपये, २९९ रूपयांच्या प्लानसाठी ३४९ रूपये मोजावे लागतील.

२८ दिवसांच्या ३४९ रूपयांच्या प्लानमध्ये जिथे २.५ जीबी दर दिवसाला डेटा मिळत होता त्यासाठी आता ३९९ रूपये भरावे लागतील.तर ३९९ रूपयांच्या प्लानसाठी आता ४४९ रूपये भरावे लागतील. यात ३ जीबी डेटा दिला जातो.
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर