जरांगेंच्या रॅलीत चोरट्यांची दिवाळी, पाच लाखांची चोरी

नाशिक : जरांगे पाटील कुणाला लाभदायी हो अथवा न हो पण नाशिकमधील चोरांना मात्र जरांगे पाटील लाभदायी झाले आहेत. त्यांच्या शांतता रॅलीच्या समारोपामध्ये पाच लाखाच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.


मंगळवारी (दि.१३) शहरात मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप झाला. तपोवनातून निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधवांची गर्दी उसळली होती. या गर्दीची संधी साधत चोरट्यांनीही हात की सफाई केली. या गर्दीत सोन्याचांदीच्या दागिण्यांसह मोबाईल आणि पाकिटे चोरट्यांनी लांबविले असून पंचवटीत चौघांच्या गळ्यातील सुमारे पाच लाखांचे दागिणे भामट्यांनी हातोहात लांबविले. याबाबत पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव पंढरीनाथ ढोली (रा. वावरेनगर, कामटवाडे) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. ढोली या रॅलीत सहभागी झाले होते. काट्यामारूती सिग्नल चौकात उभे असतांना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली. तर मालेगाव स्टॅण्ड भागात सौरभ देवचंद महाले यांच्या गळ्यातील चैन तर सिमा माधव पिंगळे या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र असा सुमारे दीड लाखाचे अलंकार भामट्यांनी हातोहात लांबविले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.

Comments
Add Comment

Rain Update : विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस ! हवामान खात्याचा 'या' जिल्ह्यांना इशारा

Rain Update : राज्यभरात आज गणेशोत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळत असताना पावसानं पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.

डेटा-लिकप्रकरणी सीईटी केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट

मुंबई: एमएच-सीईटी परीक्षेतील गैरप्रकारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात

Baramati Crime : बारामतीत ३० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे गावात ३० वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

ST Bus News: 'एसटी'कडून ५ हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकवाहिनीला मिळणार नवी ताकद

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ दाखल होण्याचा मार्ग

Central Railway : तिकीट मिळालं नाही म्हणून चिंता नको! कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या ४ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याची घोषणा

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी