तुम्हीही फोनवर कव्हर लावता का? जाणून घ्या नुकसान

मुंबई: स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक जण फोनच्या कव्हरचा वापर करतात. यामुळे फोन पडण्यापासून बचाव होतो. मात्र कव्हर लावण्याचे अनेक नुकसानही आहेत.


मागील कव्हरमुळे फोनची उष्णता योग्य पद्धतीने पास होत नाही. यामुळे फोन लवकर गरम होतो आणि त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. फोन गरम होणे त्यातील अनेक पार्टसाठी चांगले नसते. तुमच्या स्मार्टफोनचे अनेक सेन्सॉर असतात जे अधिक उष्ण झाल्याने खराब होऊ शकतात.


अनेकदा हेही पाहायला मिळाले आहे की मागील कव्हरमुळे फोनला सिग्नल कमी मिळतो. यामुळे कॉल क्वालिटी आणि इंटरनेट स्पीडवरही परिणाम होतो. इतकंच नव्हे तर फोनच्या कव्हरमुळे फोन अधिक गरम होतो. तसेच चार्जिंग स्पीडही स्लो होतो. याचा परिणाम आपल्या बॅटरीवरही पडू शकतो.


स्मार्टफोन गरम झाल्याने त्याच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होतो. फोन अधिक उष्ण झाल्याने अनेक फीचर्स काम करणे बंद होतात आणि अनेकदा तर फोन ऑफही होतो.



नेहमी योग्य कव्हर खरेदी करा


स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य बॅक कव्हर निवडले पाहिजे. ब्राँडेड फोन्ससाठी स्पेशल कव्हर बनवलेले असतात जे थोडे महागडे असतात. तुम्ही त्यातील निवडू शकता.



विना कव्हरचा वापर


जर तुमच्या हातातून फोन पडत नसेल आणि तुम्ही डिव्हाईसचे नीट लक्ष देत असाल तर तुम्ही स्मार्टफोन विना कव्हर वापरू शकता. यामुळे तुम्हाला वेगळा अनुभव भेटेल. दीर्घकाळ फोनला जर कव्हर लावून ठेवले तर फोनवर निशाण पडतात. याशिवाय अनेक पार्ट्समध्ये घाणही जमा होते. यामुळे तो वेळच्या वेळी साफ केला पाहिजे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर