Shah Rukh Khan : सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. धमकी देण्याचे प्रकरण चर्चेत असताना आता बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान (Shahrukh Khan) यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बॉलीवूड क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फैजान नावाच्या एका व्यक्तीने रायपूरहून शाहरूख खानला धमकीचा फोन केला. या धमकीमध्ये '५० लाख रुपये द्या, नाहीतर जीवे मारुन टाकू' अशी धमकी दिली. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, शाहरुखने काही दिवसांपूर्वी सलमान खानचीही भेट घेतली होती. तसेच यांचे घर जवळपास असल्यामुळे शाहरुख खानला धमकी देण्यात आली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


याप्रकरणी पोलिसांचे पथक रायपूरला गेले असून पुढील तपास अद्याप सुरू आहे. तसेच पोलिसांनी मन्नतच्या बाहेर बॅरिकेड्स लावले आहेत. तर शाहरुख खानची सुरक्षाही वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर