Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात दाखल

ठाणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) याची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनोद कांबळीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांबळीची प्रकृती सध्या स्थिर आहे.





काही दिवसापूर्वी रमाकांत आचरेकर स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमाला विनोद कांबळी उपस्थित होता. या कार्यक्रमाला सचिनही उपस्थित होता. सचिन आणि कांबळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. कांबळी हा गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्याच्या व्यसनाधीनतेमुळे त्याला खूप त्रास होत आहे. यासाठी तो अनेकवेळा पुनर्वसन केंद्रातही गेला आहे.



हृदयविकारासोबतच कांबळी इतर समस्यांमधूनही जात आहे. यापूर्वीही त्याची प्रकृती खालावली होती. आता पुन्हा एकदा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर त्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप आली नाही.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर