याआधी भारताचा पहिला डाव १८५ धावांवर संपुष्टात आला होता. ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेबस्टरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथला ३३ धावा करता आल्या. सलामीवीर सॅन कॉन्स्टासने २३ धावा केल्या.
भारताच्या पहिल्या डावात सर्वाधिक४० धावा ऋषभ पंतने केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ४ विकेट स्कॉट बोलँडने घेतल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह या सामन्यात नेतृत्वत करत आहे. तर रोहित शर्माने या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला.
पर्थमध्ये भारताने पहिला कसोटी सामना २९५ धावांनी जिंकला होता. त्यानंतर अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाने १० विकेटनी सामना जिंकला. यानंतर ब्रिस्बेन कसोटी अनिर्णीत राहिली. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी जबरदस्त विजय मिळवला.