महाराष्ट्रात ५०२३ पाकिस्तानी नागरिकांची नोंद

नागपुरात सर्वाधिक, तर मुंबईत केवळ १४


मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. देशात कोणताही पाकिस्तानी नागरिक अवैधरीत्या राहणार नाही, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.



केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपल्यानंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक देशात राहू नये. त्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात सध्या ५०२३ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी फक्त ५१ जणांकडे वैध कागदपत्रे आढळली आहेत. विशेष म्हणजे १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून, पोलीस किंवा इतर यंत्रणांना त्यांचा पत्ता लागलेला नाही. नागपूर शहरात सर्वाधिक २४५८ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, तर ठाणे शहरात ११०६ आणि नवी मुंबईत २३९ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली आहे.


मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक असून, पिंपरी-चिंचवडमध्ये २९० जणांची नोंद आहे. सध्या राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा या नागरिकांचा तपास घेत आहेत. जे बेपत्ता झाले आहेत, त्यांचा लवकरात लवकर शोध घेणे आणि अवैधरीत्या राहणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल निर्णायक ठरणार आहे, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर