“आषाढी संपली… पण पांडुरंगाने मला वारकरी बनवलं”

अभिनेत्री अमृता धोंडगे वारीत मी एक शूट करायला गेली होती. वारीमधलं एक साधं स्क्रिप्ट होत. अमृता धोंडगे आणि अजिंक्य राऊत नवविवाहित जोडपं वारीत गेलं आहे अशी झी टॉकीजच्या कार्यक्रमाची संकल्पना होती. हे जोडपं पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेतात आणि त्याचं निवेदन करतात असं दाखवलं गेलं.

अमृता म्हणते कि,' सुरुवातीला सगळं अगदी एका नॉर्मल शूटसारखंच वाटलं.कॅमेरा ऑन, लाइन डिलिव्हरी, रिअ‍ॅक्शन्स सगळं स्क्रिप्टनुसार सुरू होतं.
पण काही वेळातच सगळं बदललं.मी जसजशी वारकऱ्यांना भेटायला लागले कोणी नंगेपाय, कोणी डोळ्यांत पाणी, तर कोणी अगदी शांतपणे चालणारं…कोणालाही कसलीच तक्रार नाही, कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नाही .. फक्त एकसंध चालणं, आणि एक गाढ विश्वास – पांडुरंग आपल्यासोबतचं इथं आहे.
त्या गर्दीत धुळ उडत होती आणि त्या धुळीबरोबर माझे सगळे प्रश्न कुठेतरी मागे पडत गेले.त्या अदभुत वातावरणात मी स्वतःला हरवून बसले.
त्या क्षणी मी फक्त अभिनेत्रो किंवा निवेदिका नव्हते मी त्या वारीचा एक भाग झाले होते. मी वारकरी झाले होते. माझ्यासाठी तो क्षण फार मोठा होता,
जेव्हा एका आजोबांनी “माऊली ठेवा” म्हणत मला प्रसाद दिला. तो प्रसंग तसा हलकासा होता.पण तो माझ्या आत खोलवर हलवून गेला.

पुढे ती म्हणते कि, ' मी आयुष्यात पहिल्यांदाच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं.पालखी समोरून गेली तेव्हा काही शब्दच बोलता आले नाही कारण कित्येक वर्षांनीं माझं मन अतिशय प्रसन्न झालेलं .त्या क्षणी मनात एक विचार चमकून गेला “पांडुरंग , माउली आपल्याला बोलावत आहे या केवळ या एका आशेवर हे लोक मैलोनमैल चालत राहतात. मग आपण आज आयुष्यात नक्की काय शोधत चाललोय?” त्या वेळी माझ्या डोक्यातून स्क्रिप्ट निघून गेली होती. मी त्या चालणाऱ्या माणसांमध्ये एक सामान्य व्यक्ती बनून गेले होते जिच्या मनात फक्त एकच भावना होती. आपण आज इथे असायलाच हवं होतं आणि आज झी टॉकीजच्या शोमुळे आज आहोत असं वाटून मन शांत झालं. अर्थात मी निवेदिका म्हणून गेले. पण वारीने मला खूप काही शिकवलं आणि या पांडुरंगाच्या गर्दीतून मी स्वतःला नव्यानं ओळखलं.मात्र हा अनुभव आता फक्त माझाच राहिला नाही तो आता झी टॉकीजच्या प्रत्येक प्रेक्षकांचा आहे.कारण वारीचा हा प्रवास
रोज त्यांनीही घरात बसून अनुभवला आणि प्रत्येकाच्या मनातही पोहोचला. वारी आता संपली आहे.पण मी हरवले नाही काहीतरी नव्यानं सापडलंय, मात्र जे अजूनही शब्दांत मांडता येत नाही.”
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी