कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

केडीएमसी क्षेत्रात नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर


कल्याण (प्रतिनिधी): कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात डेग्यूमुळे कल्याणातील बेतुरकर पाडा परिसरातील एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने आरोग्य यंत्रणासह, घनकचरा व्यवस्थापनाच्या जंतुनाशक फवारणी, घुरवणी आणि डेग्यु, मलेरिया, ताप, साथरोग याबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे का राबविली जात नाही. परिसर स्वच्छता मोहीम कागदावरच का ? असा संतप्त सवाल यानिमित्ताने होत आहे.


कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा परिसरात राहत असलेल्या तरूण विलास म्हात्रे यांचा गुरुवारी सकाळी डेंग्यूमुळे दुर्दैवी मुत्यु झाला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरी आरोग्य प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. बुधवारी मनसे पक्षाने थेट मुख्यालयावर धडक देत, डेंग्यू मलेरिया संदर्भात प्रश्नाला जाब विचारत प्रशासनाला धारेवर धरले. तरी प्रशासन यंत्रणा जागी झाली नसल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने पावसाळा पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्रात व्यापक घुरवणी, फवारणी, अळीनाशक, जंतुनाशक फवारणी मोहीम होणे गरजेचे आहे. व्यापक जनजागृती माध्यमातून दक्षता काय घ्यावी हे जनसामान्यांना पर्यंत पोहचविणे गरजेचे दिसत आहे.


मे पासून आत्तापर्यंत केडीएमसी हद्दीत डेंगूचे ३५ रुग्ण आहेत. तसेच मलेरियाचे जून महिन्यात ४१ रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यात १८ रुग्ण आढळून आले असल्याची त्रोटक माहिती केडीएमसी प्रशासनाकडून बुधवारी देण्यात आली होती. तर केडीएमसीकडून आत्तापर्यंत २८ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून जवळपास ३५० घराजवळ कंटेनर इममध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्याचा अहवाल समोर आला आहे. यासंदर्भात डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ड्राय डे मार्फत पाणी साठवणूक टाळून डेंग्यू मच्छर संभाव्य वाढीस पोषक वातावरण होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे.


पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या घटक यांत पाणी साठणार नाही. मांची दक्षता घेतली पाहिजे. मेलरिया, डेग्यु संदर्भात आरोग्य विभागातील कर्मचारी सर्व्हेक्षण स्लम एरिमा ते संकुला पर्यंत केले जाते. ज्या परिसरात संभाव्य डेग्यु रूग्ण आढळल्यास त्या परिसरात धुरवणी फवारणी आदी तातडीने केली जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यामांना सांगितले.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि