चिन्मयी सुमितचे प्रतिपादन: मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेणे का आहे महत्त्वाचे!

मुंबई: सध्याच्या बदलत्या शिक्षण प्रणालीत मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी अधोरेखित केले. "संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की, पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे महत्त्वाचे आहे," असे त्या म्हणाल्या. पालकांनी बोर्ड आणि भाषेच्या बदलावर लक्ष केंद्रित न करता, मातृभाषेचे महत्त्व समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


मराठी भाषेचे भविष्य आणि इंग्रजी शिक्षणावरील विचार
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे बोलताना चिन्मयी सुमित यांनी मराठी भाषेच्या भवितव्यावरही आपले विचार मांडले. उच्चभ्रू समाजाकडून मराठी भाषेला टिकवून ठेवण्याची आशा कमी असली तरी, मध्यमवर्गीय लोक मराठी भाषा जपतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, इंग्रजी बोलता येण्यासाठी इंग्रजी माध्यमातच शिक्षण घेणे गरजेचे नाही, तर मराठी माध्यमात शिकूनही उत्तम इंग्रजी बोलता येते, असेही त्यांनी नमूद केले.


मान्यवरांचे सत्कार आणि मंडळाची प्रशंसा
या कार्यक्रमात चिन्मयी सुमित यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार आपला नसून, संस्थेच्या कामाचा गौरव आहे, असे नम्रपणे त्यांनी सांगितले. सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची प्रशंसा केली. "या संस्थेने मला घडवले आहे आणि मंडळ हे एक विद्यापीठच आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. संस्थेचे काम वाढत असून, एक 'उत्कर्ष भवन' उभारले जावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इंडोको रेमिडीजच्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे पाणंदीकर यांनी आजच्या काळात शिक्षणापेक्षा सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.


प्रकाशन सोहळा आणि गुणवंतांचा सन्मान
कार्यक्रमादरम्यान, विविध प्रकाशन सोहळे पार पडले. कार्यक्रम अध्यक्ष अदिती कारे पाणंदीकर यांच्या हस्ते 'शारदास्मृती' या जाहिरात अंकाचे प्रकाशन झाले. चिन्मयी सुमित यांनी 'प्रणामहस्तलिखिता'चे प्रकाशन केले, तर अच्युत पालव यांच्या हस्ते 'विवेकानंद स्मृती' या जाहिरात अंकाच्या दरपत्रकांचे उद्घाटन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शालांत परीक्षेत मंडळातून सर्वप्रथम आलेल्या हितेश जाधव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळप्रमुख विकास शिंदे यांनी केले, तर उपमंडळ प्रमुख नरेश विचारे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सहमंडळ प्रमुख सुधीर फके यांनी आभार प्रदर्शन केले, तर शिक्षणप्रमुख संकेत शिर्के आणि वेद गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी