'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन नाराज


केरळ: अभिनेत्री अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि छायांकन श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मात्र या बातमीमुळे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) हे प्रचंड नाखूष असल्याचे दिसून आले आहे. 'द केरळ स्टोरी' ला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांनी कडवट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.


दिनांक १ ऑगस्ट रोजी ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अनेक बॉलिवूड चित्रपटांनी या प्रतिष्ठित पुरस्काराचा सन्मान मिळवला आहे. त्यामध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि छायांकन श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मात्र या बातमीमुले केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन चांगलेच संतापले आहेत. हा चित्रपट खोट्या माहितीवर आधारित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.



द केरळ स्टोरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल का आहे केरळचे मुख्यमंत्री?


राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'द केरळ स्टोरी' चित्रपटाची वर्णी लागताच, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'या वर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले, त्यात मल्याळम चित्रपटाने मोठी कामगिरी केली. उर्वशी आणि विजयराघवन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले. दोघांनीही त्यांच्या अद्वितीय प्रतिभेने मल्याळम चित्रपटसृष्टी समृद्ध केली आहे. मला आशा आहे की हे पुरस्कार मल्याळम चित्रपटाला अधिक उत्कृष्ट चित्रपटांसह नवीन उंची गाठण्यास प्रेरित करतील.'


ते पुढे म्हणाले की, 'मात्र, केरळला बदनाम करण्यासाठी आणि सांप्रदायिकता पसरवण्यासाठी खोट्याच्या आधारे बनवलेल्या चित्रपटाला पुरस्कार देऊन, राष्ट्रीय पुरस्कार ज्युरीने धार्मिक बंधुता आणि राष्ट्रीय एकतेसाठी उभ्या असलेल्या भारतीय चित्रपटाच्या महान परंपरेचा अपमान केला आहे. याद्वारे, ते सांप्रदायिक अजेंडा राबविण्यासाठी चित्रपटाला शस्त्र बनवण्याच्या संघ परिवाराच्या अजेंडाची अंमलबजावणी करत आहेत. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. प्रत्येक मल्याळी आणि देशातील सर्व लोकशाहीवादी श्रद्धावानांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कलेचा शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या राजकारणाविरुद्ध आपण एकत्र आले पाहिजे.'



'द केरळ स्टोरी' ला विरोध का?


'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केला आहे. अभिनेत्री अदा शर्माने यात मुख्य भूमिका साकारली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात केरळमधील तीन महिला नर्सच्या जीवनावर आधारित आहे, ज्या लव्ह जिहादला बळी पडतात आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय भीषण घडत जाते, ते दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाने देशभरात चांगलाच गल्ला जमवला होता, पण केरळमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी