मुंबईत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप, ढोल ताशाच्या निनादात गणेश मूर्तींचे विसर्जन

मुंबई: दिनांक २७ ऑगस्टपासून (Ganesh Chaturthi 2025) सुरू झालेल्या गणेशोत्सवाची धामधूम आणखीन काही दिवस राज्यभरात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या पाच दिवसाच्या गणपतीचे आज विसर्जन करण्यात आले.  'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषाने आणि जड अंतःकरणाने मुंबईकरांनी बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव परिसरात विसर्जनासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती.


अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.  मुंबईच्या चौपाट्यांवर तसेच घरगुती बाप्पाच्या मूर्तीसाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात  रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू राहिले.


यादरम्यान, गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मुंबईच्या प्रमुख चौपाट्यांवर आणि तलावावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.  ज्यात विद्युत रोषणाई, निर्माल्य संकलनासाठी कुंड आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


ज्येष्ठा गौरी पूजन


आज घरगुती पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले, पण आज अनेकांच्या घरी गौराईचे आगमन झाले आहे, त्यानुसार उद्या अनेक ठिकाणी ज्येष्ठा गौरी आवाहन साजरा केला जाणार असून, तिसऱ्या दिवशी   म्हणजे मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींसोबत विसर्जन केले जाईल. त्यामुळे अजून दोन दिवस मुंबईच्या चौपाट्यांवर भाविकांची गर्दी असणार आहे.

Comments
Add Comment

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवणार?’ एकनाथ शिंदेंनी सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान