रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट दिनांक १२ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत २ कोटींची कमाई केली. कोकण संस्कृती आणि लोककलेवर आधारित असलेल्या या चित्रपटात दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका आहे. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबूली या व्यक्तिरेखेचे भरभरून कौतुक केले जात आहे. पण, यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे.


दशावतार चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, सुबोध खानोलकर यांना एक प्रश्न विचारला गेला होता. ज्यात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या 'बाबुली' या भूमिकेसाठी रजनीकांतचाही विचार झाला होता का? असे त्यांना विचारण्यात आले होते.  या प्रश्नावर सुबोध खानोलकर हसून म्हणाले, “ते रजनीकांतपेक्षा कमी आहेत का? रजनीकांत यांचा विचार वगैरे आम्ही कधीच केला नव्हता.”



बाबूली या भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांनी नकार दिला असता तर... 


सुबोध खानोलकर यांनी सांगितले की, “कथा वाचल्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात आलं की 'बाबुली'ची भूमिका खूप कठीण आहे. माझ्या डोळ्यासमोर फक्त दिलीप प्रभावळकरांचंच नाव होतं. आमची ओळखही नव्हती. मी नंबर मिळवून त्यांना भेटायला येऊ का असं विचारलं.” दिलीप प्रभावळकर हे असे कलाकार आहेत की, जे संपूर्ण स्क्रिप्ट हातात असल्याशिवाय आणि त्यातले बारकावे माहीत असल्याशिवाय होकार देत नाहीत. सुबोध पुढे सांगतात की, “माझ्याकडे फक्त कथाच होती, ती मी त्यांना ऐकवली. आमची अर्ध्या तासाची मीटिंग साडेतीन-चार तास चालली. तेव्हा माझ्या आशा वाढल्या. मी हे ठरवलं होतं की, जर 'दशावतार'ला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता, तर ही कथा मी गुंडाळून ठेवली असती. कारण, ही भूमिका इतर कोणीही सादर करू शकत नाही, हे आधीच ठरलं होतं.”


ते म्हणाले, “कथेची गरज अशी होती की यातला 'बाबुली मिस्त्री'चा रोल हा एका वृद्ध दशावतारी कलाकाराचा आहे. या भूमिकेत अभिनेता, पात्र आणि लूकचे प्रचंड व्हेरिएशन्स आहेत. ही भूमिका तशी कठीण होती. हे सगळं प्रभावीपणे करू शकेल आणि त्याकरता लागणारा स्वभाव, गंभीरता असणारं दिलीप प्रभावळकर सर सोडून दुसरं कुणीच डोक्यात नव्हतं.” म्हणूनच त्यांनी पटकथा लिहायच्या आधीच दिलीप प्रभावळकरांकडून होकार मिळवला होता.


सुबोध खानोलकर यांनी 'हापूस' आणि 'संदूक' नंतर 'दशावतार' हा कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट लिहिला आहे. कोकणातील जीवन, लोककला आणि परंपरेशी निगडित महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांना हात घालत मराठीच्या मोठ्या पडद्यावर त्यांनी 'दशावतार' जीवंत केला आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर यांची देखील भूमिका आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे.


 
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी