काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या दौऱ्यांनाही सुरूवात झाली आहे. त्यातच आज भाजप पक्षाने मुंबईत विजय संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.


तसेच आगामी महापालिका निवडणुकीत महापौर हा महायुतीचाच असणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नुकतीच मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक पार पडली होती. यात ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचा फडणवीस यांनी यावेळी दाखला दिला. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.



काहीही झाले तर महायुतीचाच महापौर


२०२४मध्ये राज्यात महायुतीचे सरकार आम्ही आणून दाखवले. महापालिकेच्या निवडणुकीतही पुन्हा महायुतीचे सरकारच येणार. काहीही झाले तर महायुतीचाच महापौर केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.



निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजला


काही दिवसांपूर्वी मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक पार पडली होती. यात ठाकरे बंधूंचा पराभव झाला होता. आमच्या उमेदवारांनी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजवला. लक्षात ठेवा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते. मात्र तुम्ही नाहीत. केवळ नाव लावल्याने कोणी ब्रँड होत नाही. आमच्या पक्षातील परंपरा बघा. आशिष शेलार यांच्यानंतर त्यांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही तर अमित साटम हे सामान्य कार्यकर्ते मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे. ते म्हणजे नरेंद्र मोदी. असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत