Dattary Bharne : पिकं बुडाली तरी आशेचा किरण; कृषीमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!

मुंबई : राज्यातील जोरदार पावसाने अनेक भागात हाहाकार उडवला आहे. काही गावांमध्ये पुराचे पाणी घरात शिरले असून, नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी कंबरेपर्यंत पोहचले आहे. यामुळे शेतजमीन आणि पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे, तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली आहे. राज्यातील ७० लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यावर योग्य तो भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. आज कॅबिनेटची बैठक होण्यापूर्वी, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर मिळेल आणि पिकांचे व्यवस्थापन पुढे चालू राहू शकेल, असा आश्वासक संदेश त्यांनी दिला.



७० लाख एकर पिकांचे मोठे नुकसान, पशुधनही प्रभावित


विदर्भात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीनंतर मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत, कारण जवळजवळ ७० लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. विशेषतः नदीकाठ आणि ओढ्याकाठची शेती या अतिवृष्टीमुळे बळी पडली असून, जमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान भयंकर आहे, तसेच पशुधनावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक गावात पाणी शिरल्यामुळे घरांमध्ये पडझड झाली आहे. या सर्व परिस्थितीवर तातडीने लक्ष ठेवून, कृषीमंत्री भरणे यांनी संबंधित अधिकार्‍यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.




अतिवृष्टीनंतर पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर


राज्यातील प्रचंड पावसामुळे शेतीसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्यात पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी पंचनामे पूर्ण झाली आहेत, तर काही ठिकाणी लगेच सुरू करण्याची प्रक्रिया आहे. हे निसर्गाचं संकट असून, सर्वांनी धीर धरावा लागणार आहे. सरकार या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ज्यांचे पंचनामे पूर्ण झाली आहेत, त्यांना नुकसानभरपाई दिली गेली आहे. तर ज्यांचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत, त्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळेल, अशी घोषणा त्यांनी केली. कृषीमंत्री यांनी हे देखील सांगितले की, प्रत्येक ठिकाणी नुकसानाचा अंदाज घेऊन त्वरित पंचनाम्याची प्रक्रिया सुनिश्चित केली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल.



निकष असले तरी मदतीसाठी सरकार सज्ज


राज्यातील अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना केंद्र आणि राज्य सरकारचे निकष निश्चित केले जातील. मात्र कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी अडचणीत असल्याने आता मदतीवर अधिक भर दिला जाईल. “हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे,” असे त्यांनी सांगितले. निकष असले तरीही, आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव मांडला जाईल, आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनंतर सकारात्मक तोडगा नक्की निघेल, असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल, आणि अतिवृष्टीतून झालेले नुकसान कमी करण्यास मदत होईल, असेही कृषीमंत्री यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि