मागील दोन वर्षापेक्षा धरण क्षेत्रात कमी साठा, पण वर्षभराची तहान भागणार....

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी जो पाणीसाठा आवश्यक असतो, तो साठा १ऑक्टोबर रोजी सकाळी घेतल्या जाणाऱ्या पाण्याच्या नोंदीवर ठरला जातो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते, त्यातुलनेत ०१ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार सर्व धरणात केवळ ९८. ७० टक्के अर्थात १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजेच ३५९ दिवसाचा साठा जमा आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यासर्व धरणांमधील पाणी साठा हा १४ लाख २८ हजार ५४९दशलक्ष लिटर अर्थात १लाख ४२ हजार ८५४ कोटी लिटर एवढा जमा झाला आहे. जुलै महिन्यांपासूनच या सर्व तलावांमधील पाणी साठा हा मागील दोन वर्षांच्या तुलने दुपटीने पुढे होता. त्यामुळेकाही दिवस धरणाचे दरवाजे उघडून त्यातील पाणी सोडण्याची वेळ आली होती. पण शेवटच्या तीन ते चार दिवस धरण क्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणातील साठा जो २७ सप्टेंबर रोजी जेवढा होता, त्यात वाढ होण्याऐवजी तो कमी झाला. त्यामुळे २७सप्टेंबर रोजी या सर्व धरणातील पाणी साठा ९९.१३ टक्के एवढा होता, जो आता कमी होऊन ०१ ऑक्टोबर रोजी ९८.७० टक्क्यांवर जाऊन पोहोचला.

विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यापूर्वी पाण्याची पातळी घटल्यानंतर पाणीकपात लागू न करता पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात आला. आणि अपेक्षेपेक्षा तलाव धरण क्षेत्रात अधिक पाऊस पडून ऑगस्टमध्येच सराव धरण काठोकाठ भरली गेली होती. त्यामुळे

०१ ऑक्टोबर रोजीचा मागील तीन वर्षांतील पाणी साठा

सन २०२५ : ९८. ७० टक्के( १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर)

सन २०२४ : ९९.३७ टक्के ( १४ लाख ३८ हजार २२७ दशलक्ष लिटर)

सन २०२३ :९९.१८टक्के (१४ लाख ३५ हजार ४५९ दशलक्ष लिटर)
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर