आधार कार्डच्या शुल्कात वाढ; नाव, पत्ता बदलण्यासाठी ७५ रुपये मोजावे लागणार

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण सेवांच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. या नवीन दरवाढीमुळे शुल्कात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ही सुधारित शुल्क यादी ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत लागू राहणार आहे.


भारतातील प्रत्येक रहिवाशासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे. नवजात बालकापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना आधार नोंदणी करणे आणि त्याचे तपशील अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. मात्र, UIDAI ने लागू केलेल्या नवीन शुल्कामुळे आधारशी संबंधित सेवांचा आर्थिक बोजा वाढला आहे. नवीन आधार नोंदणी आणि ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण यांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. परंतु इतर सेवांच्या शुल्कात लक्षणीय वाढ झाली आहे.


बायोमेट्रिक अद्ययावतीकरण: यापूर्वी १०० रुपये असलेले शुल्क आता १२५ रुपये करण्यात आले आहे (२५% वाढ). डेमोग्राफिक अद्ययावतीकरण: आधार केंद्र किंवा ऑनलाइन पोर्टलवरील शुल्क ५० रुपये वरून ७५ रुपये (५०% वाढ). पत्याचा पुरावा/ओळखीचा पुरावा/दस्तऐवज अद्ययावतीकरण: यापूर्वी ५० रुपये असलेले शुल्क आता ७५ रुपये (५०% वाढ). ई-केवायसी, आधार शोध, रंगीत प्रिंट: शुल्क ३० रुपये वरून ४० रुपये (३३% वाढ). या वाढीव शुल्कामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे. विशेषतः वारंवार अद्ययावतीकरण करावे लागणाऱ्या नागरिकांना हा बदल जास्त जाचक ठरत आहे.


मंत्रालयाने म्हटले आहे की, मोफत बायोमेट्रिक अपडेटमुळे मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेचा लाभ घेणे सोपे होईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने ७-१७ वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेटचे शुल्क माफ केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही सवलत १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झाली असून, ती एक वर्षासाठी उपलब्ध असेल. यामुळे सुमारे ६ कोटी मुलांना फायदा होईल. मंत्रालयाने म्हटले आहे की, मोफत बायोमेट्रिक अपडेटमुळे मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेचा लाभ घेणे सोपे होईल.


पाच वर्षांखालील मुलांची आधार नोंदणी त्यांचे छायाचित्र, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि जन्म प्रमाणपत्राद्वारे होते. या वयात बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत, कारण ते पूर्णपणे विकसित झालेले नसतात.


यामुळे, विद्यमान नियमांनुसार, मुलाचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आधारमध्ये बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन आणि छायाचित्र अपडेट अनिवार्य आहे. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU-१) म्हटले जाते. १५ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक असून १५ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक आहे, ज्याला दुसरा MBU म्हणतात. ५-७ आणि १५-१७ वर्षे वयोगटात केलेले हे अपडेट आता मोफत असतील.


यापूर्वी, या वयोगटाबाहेर प्रत्येक MBU साठी १२५ रुपये शुल्क आकारले जात होते. नव्या निर्णयामुळे ५ ते १७ वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत झाले आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.