चंद्रावर स्वारी... भारत २०४० चंद्रावर पाठविणार मानव!

रांची  :भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी घोषणा केली की भारताचे उद्दिष्ट २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवणे आणि परत आणणे आहे.
याव्यतिरिक्त, भारताचे पहिले मानवी अंतराळयान ‘गगनयान’ २०२७ मध्ये प्रक्षिप्त केले जाईल. रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा येथे आयोजित ३५ व्या दीक्षांत समारंभात नारायणन यांनी हे विधान केले. इस्रो प्रमुखांच्या मते, गगनयान मोहिमेपूर्वी तीन मानवरहित मोहिमा पार पडणार आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये पहिले अभियान, ज्यामध्ये अर्ध-मानवी रोबोट "व्योममित्र" अवकाशात पाठवला जाईल. त्यानंतर २०२६ मध्ये आणखी दोन मानवरहित मोहिमा होतील. गगनयानचे पहिले मानवी अंतराळयान २०२७ च्या पहिल्या तिमाहीत तयार होईल.


इस्रोचे भविष्यकालीन प्रकल्पही प्रकट झाले आहेत. २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक तयार होईल, त्याचे प्रारंभिक मॉड्यूल २०२७ पर्यंत अवकाशात तैनात केले जाऊ शकतात. चंद्रयान-४, चंद्रयान-५, मंगळ मोहिमेसह नवीन खगोलीय वेधशाळा मोहीमसारखे प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. तसेच, शुक्राचा अभ्यास करण्यासाठी व्हीनस ऑर्बिटर मिशन मंजूर झाले असून, सूर्याचा अभ्यास करणाऱ्या आदित्य-L1 मोहिमेमार्फत १५ टेराबाइट्सपेक्षा अधिक डेटा गोळा झाला आहे. इस्रो प्रमुखांनी म्हटले की, भारत अवकाश संशोधनात स्वावलंबी होण्यावर भर देत आहे, पण हवामान विज्ञान आणि सहकार्याच्या क्षेत्रात खुले आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.