विरारमध्ये ११ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पालिकेच्या गार्डनमध्ये दुर्घटना

विरार : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या गार्डनमधील तलावात खेळता खेळता पाय घसरल्याने ११ वर्षीय सार्थक मोरे या मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पालिकेचा सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे


ही घटना विरारच्या फुलपाडा परिसरातील खाडग्या तलावात घडली. सार्थक खेळण्यासाठी तलावाजवळ गेला असताना त्याचा पाय घसरून तो थेट पाण्यात पडला. मात्र तलावाजवळ ना सुरक्षारक्षक, ना जीवरक्षक… त्यामुळे वेळेत मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावाचे काम काही दिवसांपासून सुरू असून, ठेकेदाराकडून नवीन जाळी बसवण्याचे काम सुरू होते. पण प्रत्यक्षात परिसरात ना जाळी पूर्ण, ना बॅरिकेड, ना सूचना फलक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकही सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हता. या गंभीर निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.रहिवाश्यांनी थेट आरोप केला आहे की, पालिका आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळेच एका निरागस मुलाचा जीव गेला. तलावावर कोणतेही नियंत्रण अथवा देखरेख नसल्याने मुलांना निर्बंधाशिवाय जागेवर फिरता येत होते, असेही नागरिकांनी सांगितले.


वसई-विरार भागातील तलावांमध्ये गेल्या काही महिन्यांत बुडून मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. तरीही महापालिकेकडून ठोस सुरक्षा उपाययोजना होत नसल्याची तीव्र नाराजी नागरिकांत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.