राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा अपघाती मृत्यू

अकोट : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना सोमवार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्देशामुळे राज्यात ठिकठिकाणी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. या अशा वातावरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक धक्कादायक आणि दुःखद बातमी कळली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. अलमास परवीनशेख सलीम असे या महिला उमेदवाराचे नाव होते.


अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अलमास परवीनशेख सलीम निवडणूक लढवत होत्या. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज भरलेल्या पात्र उमेदवाराचा निवडणुकीआधी मृत्यू झाल्यास संबंधित मतदारसंघाची निवडणूक स्थगित केली जाते. यानंतर मृत व्यक्ती ऐवजी इतर कोणी निवडणूक लढवू इच्छीत असल्यास त्यांना एक संधी दिली जाते. एखाद्या पक्षाच्या उमेदवाराचा मृत्यू झाला तर संबंधित पक्षाला नवा उमेदवार देण्याची संधी दिली जाते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नवा उमेदवार देण्याची संधी मिळणार आहे.


निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार उमेदवारांना १ डिसेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. अपक्षांना बुधवारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रचारासाठीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तर, निवडणूक आयोगाने मतदानाच्या वेळेतही बदल केला असून २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पक्षांना आणि उमेदवारांना दिले आहेत.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवणार?’ एकनाथ शिंदेंनी सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात