मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर रोजी या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शहर देशातील पहिले फ्री वाय फाय शहर ठरणार आहे. पालिका मुख्यालयात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सांगितले की, ''विनामूल्य वाय फाय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी १५ डिसेंबर रोजी निविदा प्रक्रिया सुरू करणार असून यासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च येईल. त्यासाठी महापालिकेकडे निधी कमी पडल्यास सरकारकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल'' असेही सरनाईक यांनी सांगितले. शहरातील शाळा, महाविद्यालय, मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानक, लता मंगेशकर नाट्यगृह, शहरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालय सदर सेवा विशेष उपयुक्त ठरेल. पत्रकार परिषदेला पालिका आयुक्त राधा विनोद शर्मा, अति. आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त सचिन बांगर, शहर अभियंता दीपक खांबीत उपस्थित होते.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.