अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या कारवाईचा शिवसेनेला फटका; भाजपची मुसंडी

रवींद्र चव्हाणांनी २४ तासांत सूत्रे हलवली


अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासंघर्षाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. भाजप–काँग्रेस युतीमुळे सुरू झालेल्या राजकीय भूकंपानंतर अवघ्या २४ तासांत भाजपने संपूर्ण चित्र पालटून टाकले, तर काँग्रेस अक्षरशः रिकामी झाली आहे. या घडामोडी शिवसेनेसाठी (शिंदे गट) धोक्याची घंटा मानली जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसच्या अनपेक्षित युतीची सर्वत्र चर्चा रंगली होती. या निर्णयावर काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व १२ नगरसेवकांना निलंबित केले, तर अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती.


निलंबनानंतर २४ तासही उलटत नाहीत तोच काँग्रेसचे सर्व १२ नगरसेवक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अंबरनाथमधील काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आली असून, भाजपचे संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढले आहे.


चव्हाणांचा टॉप गियर; २०२९ ची तयारी:


भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी संघटनात्मक ताकदीवर भर दिला. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. खा. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय दिपेश म्हात्रे यांनीही कमळ हाती घेतले. भाजप आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील तणाव जुना असून, २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, अशी चर्चा होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाण्यात भाजप बॅकफूटवर गेली होती; २०२४ नंतर चित्र बदलले. चव्हाणांकडे प्रदेशाध्यक्षपद आले. चव्हाण यांनी पक्षप्रवेशांचा सपाटा लावत शिवसेनेची (शिंदे गट) राजकीय कोंडी सुरू केली आहे. अंबरनाथ, बदलापूरसारख्या पारंपरिक शिवसेना गडांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष झाले, ठाणे जिल्ह्यात सत्तासंतुलन वेगाने बदलत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२९ च्या निवडणुकांसाठी भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून, चव्हाणांनी टाकलेला ‘टॉप गियर’ शिवसेनेसाठी (शिंदे गट) वर्तमानातच नव्हे, तर भविष्यातही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.


संख्याबळात बदल, शिवसेनेची (शिंदे गट) कोंडी


अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या होत्या. भाजपला १४, काँग्रेसला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र आता १२ नगरसेवक भाजपमध्ये आल्याने सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही भाजपने नगराध्यक्षपद मिळवले असून, नव्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेला (शिंदे गट) उपनगराध्यक्षपद व समित्यांवरील दावा कमजोर झाला आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान

Thane Mayor Marathon : 'गतिशील ठाणे'! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन संपन्न

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला रविवारी मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाच्या

Thane incident : ठाण्यात दुचाकी चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याने वकिलाचा मृत्यू; मन हेलावणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Thane : ठाणे शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे

Eknath Shinde : ठाण्यातील टेंभी नाक्यावर उसळला ' लाडक्या बहिणींचा' जनसागर, आनंद आश्रमात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा

ठाणे : आनंद दिघेंच्या काळापासून चालत आलेली रक्षाबंधनाच्या सणाची परंपरा यंदाही ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या