तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष


मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांनी प्रचंड मतांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यामुळे ही जागा भाजपासाठी मान, सन्मान आणि प्रतिष्ठेचा विषय ठरली होती.


भाषिक, सांस्कृतिक व सामाजिक वैविध्याने नटलेल्या वार्ड ४७ मध्ये विजय मिळवणे भाजपासाठी मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत या वार्डमधून भाजपाला विजय मिळवून देण्याची क्षमता केवळ तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांच्यातच होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


या वार्डातील मतदारसंरचनेत सुमारे २२ टक्के मराठी, २१ टक्के दक्षिण भारतीय, १२ टक्के ख्रिश्चन आणि ६ टक्के मुस्लिम मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेससारख्या पक्षांसाठी हा प्रभाग सहज विजयाचा मानला जात होता. दुसरीकडे भाजपाचे पारंपरिक मतदार—१७ टक्के उत्तर भारतीय/पंजाबी आणि १८ टक्के गुजराती/राजस्थानी—लक्षणीय संख्येत असले तरी पुनर्विकास प्रकल्पांमुळे अनेक मतदार वार्डाबाहेर स्थलांतरित झाले होते. त्यातच मतदानाचा दिवस मकर संक्रांतीचा असल्याने गुजराती मतदारांची अनुपस्थिती हे मोठे आव्हान होते.


या सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करत मिळवलेला हा विजय तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांच्या अथक मेहनतीचा, स्थानिक पातळीवरील प्रचंड स्वीकारार्हतेचा आणि घरोघरी पोहोचलेल्या प्रभावी जनसंपर्काचा परिणाम आहे.


तेजिंदर सतनाम सिंग तिवाना आणि त्यांचे कुटुंब गेली ४० हून अधिक वर्षे या परिसरात सातत्याने जनसेवा करत आहे. कोणताही पदभार नसतानाही नागरिकांच्या अडचणींसाठी २४x७ उपलब्ध राहण्याची त्यांची परंपरा असल्यामुळेच परिसरातील जनतेचा त्यांच्या कुटुंबावर दृढ विश्वास आहे.


या विजयाचे श्रेय भाजपाच्या ज्येष्ठ नेतृत्वालाही जाते, ज्यांनी युवकांवर विश्वास टाकत त्यांना संधी दिली. युवकांनी आपल्या नव्या विचारसरणी, ऊर्जेने आणि संघटन कौशल्याने या बीएमसी निवडणुकीचे राजकीय चित्रच बदलून टाकले आहे.
तेजिंदर यांचे “मदत का ठिकाना” हे अभिनव अभियान या निवडणुकीची ओळख ठरले. या अभियानामुळे निर्माण झालेला उत्साह नगरसेवक निवडणुकीपुरता मर्यादित न राहता विधानसभा निवडणुकीसारखा भासू लागला. अभियानातील गीते, जाहिरात चित्रफिती आणि सोशल मीडियावरील प्रभावी संवाद थेट जनतेच्या हृदयाला भिडला.


तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा हा विजय खऱ्या अर्थाने मुंबईच्या स्पिरिटचा विजय आहे—जिथे भाषा, प्रांत आणि समाजाच्या पलीकडे जाऊन, मेहनती, नेहमी उपलब्ध असलेल्या एका तरुण नेतृत्वाला जनतेने प्रचंड विश्वासाने विजयी केले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर