बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन

मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहाला ठोस आकार देणारे नेते म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यभरातून अनेक नेते मंडळी त्याशिवाय सामान्य जनतेकडूनही अभिवादन करण्यात येत आहे. ठाम भूमिका, परखड विचारसरणी आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची ताकद यामुळे बाळासाहेबांनी जनमानसावर कायमची छाप उमटवली.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. बाळासाहेबांच्या सोबतच्या आठवणीचे काही खास क्षण त्यांनी आपल्या एक्स वर पोस्ट केले आहेत. नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट यामध्ये लिहिलंय की "बाळासाहेब ठाकरे यांची ओळख केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर समाजाचं बारकाईने निरीक्षण करणारे विचारवंत होते. त्यांच्या भाषणांमधून सामाजिक प्रश्न, राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा ठळकपणे मांडला जायचा, त्यांचा शब्दातही धार होती.


https://x.com/narendramodi/status/2014515348041806174?s=20

राजकारणाबरोबरच कला, साहित्य आणि पत्रकारितेचा त्यांना विशेष अभ्यास होता. व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी समाजातील विसंगती, सत्ताकारण आणि लोकजीवनावर नेमकं भाष्य केलं. त्यांच्या कार्टूनमधून निर्भीड मतप्रदर्शन आणि विचारांची स्पष्टता दिसून येत असे, ज्यामुळे ते सामान्य माणसापर्यंत सहज पोहोचले."


महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली दृष्टी आजही अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे. मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि राज्याच्या विकासाचा ध्यास त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून आला. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याचा संकल्प आम्ही करत आहोत.'


बाळासाहेब म्हणजे अस्विस्मर्णीय नेतृत्व ज्याचं स्थान मराठी माणसाच्या मनात हे कायम असेलच.

Comments
Add Comment

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवणार?’ एकनाथ शिंदेंनी सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान