कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आले. मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जाअभावी ही कुटुंबे सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन साकडे घातले. याबाबत महसूलमंत्र्यांच्या दालनात संयुक्त बैठक घेणार असल्याचे संजय केळकर म्हणाले.


सुमारे ६५ वर्षांपूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त ८०हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आले आहे. मात्र या कुटुंबांच्या तीन पिढ्या सोयी सुविधांपासून वंचित असल्याची व्यथा या ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली. किमान सात एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव चार एकरवर असून आणखी तीन एकर जमीन गावाला मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्याने शासनाच्या विकास योजना तसेच सोयी-सुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गेल्या ६५ वर्षांत तीन पिढ्यांचे जीवनमान ढासळले आहे. जिल्हा परिषदेची विकासकामे सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी संजय केळकर यांच्या निदर्शनास आणली. याबाबत आ.केळकर यांनी लवकरच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करून महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. गावाला महसूल दर्जा आणि गावठाण मंजुरीबाबत संजय केळकर यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असून त्याला यश मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात शुक्रवारी ठाण्यासह इतर तालुक्यांतील नागरिकही समस्यांची निवेदने घेऊन आले होते.
यात बाळकुम येथील दोस्ती गृहसंकुल परिसरात वाढत्या अपघातांमुळे गतिरोधकाची मागणी, ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांच्या समस्या, मॉडेला चेक नाका येथील कामगार कार्यालय, बेथनी रुग्णालयात रुग्णाचे बिल कमी करणे, शर्मिला सोसायटी, शिधावाटप कार्यालय, सन मोटर्स यांनी केलेली फसवणूक, विकासकाकडून झालेली फसवणूक आदी समस्यांची निवेदने प्राप्त झाली. संजय केळकर यांनी काही प्रकरणात तत्काळ संबंधितांना फोन करून त्यावर निर्णय घेतले तर काही प्रकरणांचा पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात अनिल भगत, राजेश गाडे, दिपक गायकवाड, विशाल वाघ, राजेश जाधव, राजेश ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच