वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र आहे. जेव्हीएलआर ते कफ परेड हा दीर्घ प्रवास काही मिनिटांत शक्य झाला असला, तरी वरळी ते कुलाबा या भूमिगत टप्प्यात मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, आरे जेव्हीएलआर ते सुरुवातीच्या काही स्थानकांपर्यंत मोबाईल नेटवर्क, इंटरनेट आणि कॉल सेवा सुरळीत सुरू असते. मात्र वरळी स्थानकानंतर सिग्नल गायब होतात. सुमारे ३० ते ४० मिनिटे प्रवासी ‘नॉट रिचेबल’ राहतात. या काळात ना कॉल लागत आहेत, ना इंटरनेट सेवा कार्यरत आहे.

या समस्येचा सर्वाधिक फटका कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि कॉलेजला जाणाऱ्या तरुणांना बसत आहे. प्रवासादरम्यान महत्त्वाचे कॉल, ऑनलाईन कामकाज, पेमेंट्स किंवा आपत्कालीन संपर्क पूर्णपणे ठप्प होत असल्याने अनेक प्रवाशांनी या मेट्रो प्रवासावर नाराजी व्यक्त केली आहे.

प्रवाश्यांच्या तक्रारींबाबत मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅक्वा लाईनचा मोठा भाग भूमिगत असल्याने मोबाईल नेटवर्कसाठी आवश्यक असलेल्या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरचं काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. सर्व मोबाईल सेवा प्रदात्या कंपन्यांशी समन्वय साधून नेटवर्क मजबूत करण्याचं काम सुरू असून, लवकरच ही अडचण दूर केली जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

नेटवर्क समस्या कायमस्वरूपी नाही नव्या नेटवर्क सुविधा सुरु होईपर्यंत प्रवाश्यांना हा हा त्रास सहन करावा लागणार आहे; असेही मेट्रो प्रशासनाने सांगितल.
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर