ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान 

'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोप


मुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही आता एक लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन फलोत्पादन, रोजगार हमी योजना आणि खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.केंद्र शासनाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविण्यात आलेल्या 'संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम) २०२५-२६' या महाराष्ट्र राज्य स्तरीय अभियानाचा सांगता समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.


मंत्री गोगावले म्हणाले की, वाढते प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि हरित इंधनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने इंधन बचतीचे कर्तव्य पार पाडावे.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा पुढाकार


१ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानाचे मुख्य घोषवाक्य ‘तेल आणि वायू वाचवा, हरित ऊर्जेचा स्वीकार करा’ असे होते. जनसामान्यांमध्ये इंधन बचतीचा संदेश पोहोचवणे, परकीय चलनाची बचत करणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून निसर्गाचे रक्षण करणे. या अभियानात बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी आणि गेल इंडिया यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतला.

विविध उपक्रमांनी गाजला महोत्सव


गेल्या १५ दिवसांत राज्यात विविध स्तरांवर प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये सायकल रॅली, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आणि वाहनचालकांसाठी विशेष तांत्रिक कार्यशाळांचा समावेश होता. या अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि गृहिणींपर्यंत इंधन बचतीचे तंत्र पोहोचवण्यात आले.


यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते अभियानातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी केले. या सोहळ्याला बीपीसीएलचे थॉमस जेम्स, एचपीसीएलचे मुकुंद जवंजल, आयओसीएलचे संतोष दैत, गेल इंडियाचे मोहम्मद शफी, मुख्य प्रबंधक दीपक वाघ, वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव यांसह तेल कंपन्यांचे अधिकारी, इंधन वितरक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी केले.
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर