Harshvardhan Sapkal : मी तुलना केलीच नव्हती मात्र...अखेर शिवरायांच्या अपमानावरून हर्षवर्धन सपकाळांची माफी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याच्या धाडसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अखेर नमते घ्यावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या राज्यव्यापी एल्गारानंतर आणि शिवप्रेमींच्या तीव्र आंदोलनासमोर सपकाळ यांनी हात जोडत आपली दिलगिरी व्यक्त केली. "ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांच्याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो," असे म्हणत सपकाळ यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.



भाजपचा आक्रमक पवित्रा आणि सपकाळांची सारवासारव


काँग्रेसने नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. टिपू सुलतानसारख्या वादग्रस्त व्यक्तीचा आदर्श छत्रपती शिवरायांशी जोडणे, हा केवळ महाराजांचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेवर केलेला घाला आहे, अशी भूमिका भाजपने मांडली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आणि इतर शहरांत रस्त्यावर उतरून सपकाळ यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या वाढत्या दबावामुळे सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले की, "मी तुलना केलीच नव्हती, माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला." मात्र, भाजपने याला काँग्रेसची नेहमीची 'यु-टर्न' घेण्याची पद्धत म्हटले आहे.



"टिपू सुलतानांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही"


सपकाळ यांनी आपल्या स्पष्टीकरणात टिपू सुलतानांचा उल्लेख संविधानातील प्रतिमेचा दाखला देत केला आणि त्यांना शिवरायांकडून प्रेरणा घेणारे म्हटले. यावर भाजप नेत्यांनी पलटवार केला आहे. "हिंदूंचे दमन करणाऱ्या टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करण्यासाठी शिवरायांच्या नावाचा आधार घेणे हे काँग्रेसचे दिवाळखोर वैचारिक धोरण आहे," अशी टीका भाजपकडून करण्यात आली. धर्मांतराचे आणि अत्याचाराचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीची तुलना स्वराज्याच्या संस्थापकांशी करणे ही शिवद्रोहाचीच कृती असल्याचे भाजपने ठामपणे सांगितले.



धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव?


सपकाळ यांनी उलट भाजपवरच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप केला असला, तरी भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. "लोकांच्या भावना भडकवणारी वक्तव्ये काँग्रेसचे नेते करतात आणि जेव्हा जनता जाब विचारते, तेव्हा भाजपवर खापर फोडतात," असा टोला भाजप प्रवक्त्यांनी लगावला. अखेर जनरेटा आणि शिवप्रेमींचा रोष पाहता सपकाळ यांना माफी मागावी लागली, हा भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि शिवरायांच्या सन्मानाचा विजय असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर