शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी रायगडवरील 'ही' महत्त्वाची सेवा सहा दिवस पूर्णपणे बंद

पुणे: शिवप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या किल्ले रायगडावरील रोप-वे सेवेबाबत प्रशासनाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रोप-वेची सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. रोप-वेच्या वार्षिक तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, पर्यटकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्याप्रमाणे करावे, असे आवाहन रोप-वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


सालाबादप्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही नियमित प्रक्रिया राबवली जाते. या सहा दिवसांच्या कालावधीत रोप-वे यंत्रणेची सखोल तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्य केबल्स आणि ट्रॉलीची तपासणी, ब्रेक प्रणाली आणि सुरक्षा उपकरणांची चाचणी तसंच विद्युत यंत्रणा आणि तांत्रिक सुटे भाग यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. गडावर येणाऱ्या हजारो पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा, याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.



१ मार्चपासून सेवा पूर्ववत



२८ फेब्रुवारी रोजी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, १ मार्च २०२६ पासून रोप-वे सेवा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी नियमितपणे सुरू केली जाईल. जे पर्यटक पायी चढून जाऊ शकत नाहीत, त्यांनी या तारखांची नोंद घेऊन आपले नियोजन करावे, जेणेकरून गडावर आल्यावर त्यांची गैरसोय होणार नाही.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.