जितेंद्र आव्हाडांचे शिवरायांविषयीचे विधान जाणीवपूर्वक - मंत्री शंभूराज देसाई

- जितेंद्र आव्हाडांना कठोर किंमत मोजावी लागेल


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत केलेले विधान हे अनावधानाने आलेले नसून, ते पूर्णपणे जाणीवपूर्वक केलेले आहे. या निंदनीय कृत्यासाठी त्यांना कठोर किंमत मोजावी लागेल, असा इशारा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.


धर्मस्वातंत्र्य विधेयकावरील चर्चेदरम्यान आव्हाडांनी ऐतिहासिक संदर्भांचा विपर्यास करत शिवरायांचा अपमान केला. यावर भाष्य करताना देसाई म्हणाले की, "मी स्वतः सभागृहात उपस्थित होतो. आव्हाडांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ते दिलगीर असल्याचे कोठेही जाणवत नव्हते. उलट, अध्यक्षांनी तीन वेळा निर्देश देऊनही ते मोबाईलमध्ये व्यस्त होते. त्यांना आपल्या वक्तव्याचे कोणतेही गांभीर्य नव्हते."


सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतरही आव्हाड माफी मागण्यास तयार नव्हते, असे देसाई यांनी सांगितले. "आमची सर्वांची इच्छा त्यांना निलंबित करण्याचीच होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी त्यांना कठोर शब्दांत समज देऊन माफी मागण्याचे निर्देश दिले. अखेर कारवाईच्या भीतीने त्यांनी शब्द मागे घेतले," असेही त्यांनी स्पष्ट केले.



उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा राजकीय नव्हे!


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून होत असलेल्या चर्चेलाही शंभूराज देसाई यांनी पूर्णविराम दिला. "संसदेचे अधिवेशन सुरू असताना शिवसेना खासदारांच्या बैठकीसाठी आणि राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. जिल्हा परिषद निवडीसारख्या स्थानिक प्रश्नांसाठी दिल्लीला जाण्याची त्यांना गरज नाही," असे त्यांनी सांगितले.



महायुतीचा अहवाल तयार :


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आद्यप झालेली नाही. राज्यभरात ज्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवली गेली नाही, त्या ठिकाणांचा रिपोर्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आलेला आहे. उदय सामंत, मी, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ या समितीमध्ये आहे. मित्रपक्षांबद्दल समन्वय समितीमध्ये चर्चा करू, असेही देसाई यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवणार?’ एकनाथ शिंदेंनी सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान