यापुढे महापालिकेत ५० खोक्यांची भाषा करणाऱ्यांना मिळणार ५० ठोसे

अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांना आता सभागृहाबाहेरचा रस्ता


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात यापुढे अशासकीय भाषा खपवून घेतली जाणार नाही. यापुढे जर सभागृहात ५० खोक्यांची भाषा झाल्यास त्यांना ५० ठोसे दिले जातील आणि त्यासाठी महायुतीच्या नगरसेवकांनी तयार राहावे. आज जी परिस्थिती आहे, ती भविष्यात मोठ्याप्रमाणात उद्भवेल आणि तेव्हा समारेच्या बाजुला जाण्याचीही तयार ठेवा असाही कानमंत्र सभागृहनेत्यांनी महायुतीच्या नगरसेवकांना दिला. मात्र, याचबरोबरच महापालिका सभागृहात अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्या सदस्यांवर तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली असून त्यादृष्टीकोनातून येत्या सभागृहांची दिशा बदलेली पहायला मिळणार आहे.


मुंबई महापालिका सभागृहात विराेधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर दालनात झालेल्या अपमानप्रकरणी हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर याचा निषेध करत सभात्याग केला. त्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी सभागृहात जे वर्तन घडले ते दुर्दैवी आहे. मात्र आता भविष्यात आपल्याला मानसिक तयारी करावी लागेल. पाण्यात दगड मारायचा आणि पळ काढायचा असा प्रकार होतच राहणार. तसे खोक्याचे आरोप करत चिमटे काढणे असे प्रकार होतच राहणार. ही भाषा बरोबर नाही. पण यापुढे ५० खोक्यांचे जे भाषा करतील त्यांना ५० ठोसे देण्यासाठी तयार रहा. ही भाषा बरोबरच नाही.आज पेंग्विनचा उल्लेख केल्याशिवाय बैठक होत नाही आणि असे काैतुक करत पुढील वर्षी काहीतरी आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न असतो.


तत्पूर्वी शिवसेनेच्या नगरसेविका व स्थापत्य समिती अध्यक्षा यामिनी जाधव यांनी उबाठाच्या नगरसेवकांकडून अमेय घोले यांना उद्देशून बोलायला तोंड आहे का असे बोलत ५० खोके अशी घोषणाबाजी केली याचा समाचार घेतला. यापुढे अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांविरोधात त्वरीत कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली. पूर्वी स्थायी समितीवर नाग बसला म्हणून बोलायचे. पण स्थायी समितीवर नाग नाही तर शेषनाग असून ते या तिजोरीचे रक्षणकर्ते आहेत. पूर्वी ही स्थायी समिती कोणाच्या इशाऱ्यावर चालायची असा सवाल करत मातोश्री २ कुठल्या पैशातून बांधली असा सवाल केला. तसेच पूर्वी खोके कुठे जात होते. पूर्वी मातोश्रीवरुन आदेश आल्याशिवाय एकतरी प्रस्ताव मंजूर केला जायचा का असा सवाल केला. आमचे कुटुंब आमची जबाबदारी असे ब्रीदवाक्य घेवून फिरणऱ्या नेत्याने जेव्हा आमच्या घरावर इन्कम टॅक्स,ईडीची धाड पडली तेव्हा, तुमचे तुम्ही बघा म्हणून सांगितले. पण आमचे कुटुंब, आमची जबाबदारी सांगणाऱ्या नेत्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले. आजच आमच्यावर एवढे खोके, तेवढे खोके म्हणून आरोप करतात, तर मग हे शोधून दाखवा ना असे आव्हान दिले. कोणत्याही परिस्थितीत सभागृहाचे पावित्र्य टिकवले गेले पाहिजे,असे सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर