मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच 


मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर आता मोठा बदल होणार आहे. मागेच घाटात एक प्रोपोलिन गॅस ने भरलेला टेम्पो उलटला होता त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक झाले आणि नागरिकांना तिकडेच २ दिवस अडकून राहावे लागले. अनेक पर्यायी मार्गांचा शोध घेत नागरिकांनी आपली सुटका करून घेतली, अशी परिस्थिती पुन्हा उदभवू नये म्हणून सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महामार्गाचे १० पदरीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) घेतला असून, यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.



प्रकल्पाला लवकरच गती


मिळालेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करत पुढील ३ वर्षांत, म्हणजेच २०२९-३० पर्यंत संपूर्ण विस्तार पूर्ण करण्याचे उदिष्ठ आहे. सध्या असलेल्या मार्गावर वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणारी कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.



टोल वसुलीचा कालावधी वाढणार


या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असून, तो वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी सध्याच्या टोल वसुलीची मुदत १५ वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आता या मार्गावर टोल वसुली २०४५ ऐवजी २०६० पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.



मिसिंग लिंक प्रकल्पही निर्णायक


दरम्यान, एक्सप्रेसवेवरील महत्त्वाचा १३ किमीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास घाटातील वळणे आणि अपघातप्रवण भाग टाळून प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. शिवाय मुंबई–पुणे अंतर कमी होऊन वेळेची बचत होईल.



वाहतुकीवर परिणाम टाळण्याचा प्रयत्न


विस्तारीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने काम करून प्रवाशांना कमीत कमी अडचण येईल, याची काळजी MSRDC कडून घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


एकीकडे १० पदरीकरण दुसरीकडे टोल वसुलीचा कालावधी वाढणार असला, तरी मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. भविष्यातील वाहतूक लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर