Asha Bhosle : ज्या गाण्याला बॅन करण्यात आलं त्याच गाण्यानं मिळवून दिला पुरस्कार

मुंबई : संगीत विश्वातील प्रसिद्ध नाव, आशा भोसले (Asha Bhosle) आज काळाच्या पडद्याआड गेलंय. पण, त्यांच्या अजरामर गाण्यांमधून त्या नेहमीच आपल्यात राहतील. सिनेसृष्टीतील दिग्गज गायिका आणि भारतरत्न, 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांनी तब्बल सहा दशकं आपल्या गाणांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं.


केवळ हिंदी, मराठीच नाहीतर २० हून अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गाऊन त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. पण, आशा भोसले यांनी गायलेल्या एका गाण्यामुळे मोठा गदारोळ झालेला.मात्र, पुढे त्याच गाण्यासाठी त्यांना बेस्ट प्लेबॅक सिंगर फीमेल म्हणून गौरवण्यात आलं.


आशाताईंनी अनेक गाणी गायली, पण त्यापैकी एका गाण्यामुळे मोठा गदारोळ झालेला. हे गाणं रेडिओवर बॅन करण्यात आलेलं, तर दूरदर्शनवरील प्रक्षेपण थांबवण्यात आलेलं. पण तरीही, तेच गाणं एवढं गाजलं की, आजही अनेकजण हे गाणं म्हणतात. आशाताईंच्या आवाजातल्या या गाण्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. ते गाणं म्हणजे, १९७१ मधील गाजलेला 'ब्लॉकबस्टर' सिनेमा 'हरे रामा हरे कृष्णा' मधील, देव आनंद आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं 'दम मारो दम' आशा भोसले यांच्या आवाजातील 'दम मारो दम' हे गाणं प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडलं.


या गाण्याचं संगीत आर.डी. बर्मन यांनी दिलं होतं, तर गीतलेखन आनंद बक्षी यांनी केलेलं. या गाण्यात झीनत अमान यांना 'हिप्पी' अवतारात, हातात 'चिलिम' घेऊन धूम्रपान करताना चित्रित करण्यात आलेलं, यामुळे झीनत अमान यांना असं दाखवणं म्हणजे, अंमली पदार्थांच्या संस्कृतीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं गेलं आणि त्यामुळे या गाण्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले. अनेक समीक्षकांनी या गाण्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि हे गाणं भारतीय सांस्कृतिक मूल्यांच्या विरोधात असल्याचं मानलं गेलं. ते तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला.



माहितीनुसार, या गाण्याभोवतीचा वाद इतका चिघळला की, 'ऑल इंडिया रेडिओ'नं चक्क त्यावर बंदी घालण्यापर्यंत मजल मारली. तसेच, सिनेमाच्या दूरदर्शनवरील प्रसारणादरम्यान 'दूरदर्शन'नं हे गाणं पूर्णपणे वगळलं होतं. जेव्हा हा सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातून 'दम मारो दम' हे गाणं पूर्णपणे काढून टाकण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, याच गाण्यासाठी आशा भोसले यांना 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' हा पुरस्कारही मिळाला होता.


देव आनंद यांचा या गाण्याच्या माध्यमातून सिनेमात अंमली पदार्थांच्या विरोधात संदेश देण्याचा उद्देश होता, पण, या गाण्याची चाल आणि चित्रीकरणामुळे या गाण्याला एक वेगळीच ओळख मिळाली.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी