मुंबई : राज्याच्या राजधानीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन खून झाल्याने मुंबई हादरली आहे. काही मोठ्या घटनांमुळे नाही तर छोट्या गोष्टींमुळे झालेल्या या घटनांमुळे माणसाचा राग किती टोकाला जाऊ शकतो, आणि त्या रागाच्या भरात माणूस जीवही घेऊ शकतो, हेच यातून स्पष्ट होते आहे. मुंबईतील दादर, माटुंगा, खेरवाडी परिसरात या घटना घडल्या असून संबंधित परिसरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हत्येची कारणं
दादर : पत्नीसमोरच पतीचा केला खून
पूर्ववैमनस्यातून दादरमध्ये पत्नीसमोरच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हाती आलेल्या माहितीनुसार, अंकुश आंबेकर ( २८ ) या तरुणाचा गौरव सनस याच्याशी जुना वाद होता. एकूण सात जणांनी मिळून अकुंशला बेदम मारहाण केली. पत्नीने गौरवला केईएम रुग्णालयात नेले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
माटुंगा : पार्किंगच्या वादातून एकाची हत्या
खेरवाडी : जुन्या वादाचा घेतला बदला
खेरवाडीत कल्पतरू स्पार्कल्स येथे ही घटना घडली असून, दोन अज्ञात व्यक्तींच्या हल्ल्यात अभिनव चौधरी या इसमाची हत्या झाली आहे. सलग तीन हत्यांमुळे मुंबईत खळबळ उडाली असून, काही आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत, मुंबई पोलीस या प्रकरणांचा कसून तपास करत आहेत.