Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा


अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७ ऑगस्टपर्यंचे नियोजन


मुंबई : पावसाळा तोंडावर आला असला तरी अन निनोेचे सावट कायम असल्यामुळे पावसाचा नेमका अंदाज बांधणे अशक्य आहे. तरीही पाऊस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता लक्षात घेता येत्या १५ मे पासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी जाहीर केले. सध्या तलावांमधील उपलब्ध साठा आणि राज्य शासनाकडून भातसा आणि वैतरणा धरणातून निभावणी साठा अर्थात राखीव कोट्यातील पाणी याच्या आधारे पाण्याचे नियोजन करताना दहा टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध साठा, राखीव साठ्यातील पाणी आणि कपातीनंतर बचत केलेला साठा याद्वारे पाणी वाचवून येत्या १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुरेल एवढा पाणी साठा राखून मुंबईकरांची पाण्यामुळे कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.


 

[caption id="attachment_1020688" align="alignnone" width="442"] water cut news[/caption]

 


मान्सूनपूर्व आढावा संदर्भात विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, भातसा,मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, मोडक सागर या सर्व धरणांमध्ये सध्या २८ टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध अल निनोचा प्रभाव लक्षात घेता पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवली जात आहे. येत्या १ मे नंतर याची आणखी स्थिती समजू शकेल. परंतु सध्या उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यामध्ये पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करणे आवश्यक आहे.



तलावातील पाणी साठा कमी झाल्याने भातसामधून १४७ एमसीए आणि वैतरणातून ९० एमसीए अशाप्रकारे २३७ एमसीए एवढा निभावणी साठ्यातील पाणी वापरण्यास परवानगी मिळावी म्हणून मागणी केली आहे. त्याला मंजुरी प्राप्त होईल. त्यामुळे उपलब्ध साठा आणि निभावणी साठ्यामधील पाणी वापरले तरी आतापर्यंत ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करता येत नाही. त्यामुळे दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. ही कपात केल्यास मुंबईला १७ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवले जावू शकते. परंतु सध्याचा उपलब्ध पाणी साठा ४ जुलैपर्यंतच पुरेल एवढा आहे. त्यामुळे येत्या १५ मे पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर