नागपूर: नागपुरातील व्यंकटेशनगरमध्ये घडलेल्या माय-लेकीच्या आत्महत्येच्या प्रकरणामागील धक्कादायक कारण अखेर समोर आले आहे. जमिनीच्या वादातून पती आणि सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून दोघींनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती तपास केल्यानंतर समोर आली आहे.
नागपुरातील व्यंकटेशनगर परिसरात आई आणि मुलीने एकाच वेळी गळफास लाऊन आत्महत्या केली होती, या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणाचा तपास करताना नंदनवन पोलिसांना गंभीर आणि संतापजनक माहिती मिळाली आहे. पत्नी आणि तिच्या आईच्या नावावर असलेली संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पती लोकेश ब्रह्मे आणि त्याच्या कुटुंबीयांनी सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्यामुळेच या दोघींनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
पैशांसाठी छळ, बाळाच्या मृत्यूनंतर वाढला त्रास
जमिनीवर डोळा, अत्याचाराची परिसीमा
या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी आकांक्षाचे मामा विलास केशवराव पिसे यांच्या तक्रारीवरून पती लोकेश ब्रह्मे याच्यासह सासरच्या पाच जणांविरुद्ध हुंडाबळी आणि छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे.