Mumbai Fire Brigade : मुंबईत वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, अग्निशमन दलाने केले दक्षतेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये विद्युत यंत्रणांवर ताण येऊन शॉर्ट सर्किट, ओव्हरलोडिंग यांसारख्या कारणांमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईकरांनी नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मुंबई अग्निशमन दलास अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.


मुंबई महानगरात तापमान वाढत आहे. उन्हाळा प्रखरतेने जाणवत आहे. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी संकुलांमध्ये पंखे, एअर कुलर, एअर कंडिशनर, फ्रिज व इतर विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. याशिवाय उष्ण व कोरडे वातावरण, ज्वलनशील पदार्थाची अयोग्य साठवणूक, कचरा जाळणे तसेच गॅस गळती यांसारख्या कारणांमुळेही आग लागण्याचा धोका वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाने नागरिकांना सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घरातील व इमारतीतील विद्युत वायरिंग, स्विच बोर्ड आणि प्लग पॉइंट्स यांची नियमित तपासणी करुन त्यांच्या जोडणीबाबत खात्री करावी. तसेच एका प्लग पॉइंटमध्ये अनेक उपकरणे जोडून ओव्हरलोडिंगसारखे प्रकार टाळणे गरजेचे आहे.


एअर कंडिशनर, कुलर इत्यादी उपकरणे वापरताना सुरक्षित व दर्जेदार विद्युत जोडणीचा वापर करावा. घरात किंवा परिसरात कचरा, झाडांची, वेलींची कोरडी पाने किंवा इतर ज्वलनशील वस्तू जाळू नये. एलपीजी गॅस सिलिंडर व गॅस पाईपची संबंधित तज्ज्ञांकडून नियमित तपासणी करावी. प्रत्येक इमारतीतील, घरातील व निवासी / अनिवासी दालनातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहेत का, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.


इमारतींचे, व्यापारी संकुलांचे जिने तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवावेत. जेणेकरून एखादी घटना घडल्यास नागरिकांना सुखरुपपणे बाहेर पडता येईल. यासोबतच आपली वाहने निश्चित केलेल्या जागेत उभी करावीत. दुर्दैवाने कुठे आग लागण्याची घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या वाहनांच्या मुक्त व सुरळीत हालचालीसाठी आवश्यक तेवढी पुरेशी जागा मोकळी ठेवावी. कोणत्याही प्रकारची आग लागल्यास घाबरून न जाता तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ किंवा ०२२-२३००१३९०, ०२२-२३००१३९३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख अग्निमशन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर