Thalapathy Vijay : तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय रविवारी सकाळी शपथ घेणार

चेन्नई : तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय उर्फ चंद्रशेखरन जोसेफ विजय रविवारी सकाळी दहा वाजता शपथ घेणार आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी थलपती विजयला सत्ता स्थापनेची संधी दिली आहे. राज्यपालांनी विजयला बुधवार १३ मे २०२६ पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.



याआधी संध्याकाळी थलपती विजयने राज्यपालांना भेटून १२१ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा केला. सत्तेसाठी थलपती विजयच्या टीव्हीके या पक्षाने एकूण पाच पक्षांचा पाठिंबा मिळवला आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांची संख्या १२१ च्या घरात पोहोचली आहे. टीव्हीकेला काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. टीव्हीकेचे १०८ आमदार निवडून आले आहेत. पण विजय दोन मतदारसंघात विजयी झाला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत तो एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा देईल आणि तिथे पोटनिवडणूक होईल. अद्याप हा राजीनामा आलेला नसल्यामुळे कागदोपत्री टीव्हीकेचे १०८, काँग्रेसचे ५ तर सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल यांचे प्रत्येकी दोन असे एकूण १२१ आमदार आहेत. यामुळे २३४ आमदारांच्या तामिळनाडू विधानसभेत विजयकडे बहुमत असल्याचे दिसत आहे.



तामिळनाडूत सत्तास्थापनेसाठी २३४ आमदारांच्या विधानसभेत ११८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. विजयकडे यापेक्षा जास्त आमदार आहेत. विजयने दोन पैकी एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला तर पोटनिवडणुकीचा निकाल येऊन नव्या आमदाराने शपथ घेईपर्यंत सभागृहाची सदस्य संख्या २३३ असेल आणि बहुमताचा जादुई आकडा (मॅजिक फिगर) ११७ असेल.



विजयने पहिल्यांदा राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची संधी मिळावी अशा स्वरुपाचे पत्र दिले नव्हते. त्याने स्वतःच्या १०८ आमदारांसह काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे ११२ जणांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले होते. यामुळेच राज्यपालांनी विजयला बहुमत घेऊन ये आणि सत्ता स्थापनेचा दावा कर अशी सूचना केली. आता विजयने १२१ आमदारांची जुळवाजुळव झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.


पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. पुदुच्चेरीत एनडीएचीच सत्ता सलग दुसऱ्यांदा आली आहे. एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भाजपची युती पुन्हा सत्तेत आली आहे. रंगास्वामी १३ मे रोजी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. तर आसाममध्ये भाजपने हॅटट्रिक केली आहे. पुढील एक दोन दिवसांत आसाम सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. पण केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्ष हा गंभीर प्रश्न सोडवण्यात गुंतला आहे.

Comments
Add Comment

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.