राजस्थान : राजस्थानमधील श्रीगंगानगर (Sri Ganganagar) येथे सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट कायम ठेवला असून भारत - पाकिस्तान सीमा लगतच्या (India–Pakistan border) भागात विशेष बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घुसखोरीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
दरम्यान, प्रशासनाने स्थानिक नागरिकांना घाबरून न जाता नियमांचे पालन करण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.






