Maharashtra Assembly’s Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या १७ जागा भरणार?

निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग; स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची अट पूर्ण झाल्याने मार्ग मोकळा


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी या निवडणुका पार पडल्यास वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.



राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे अनेक मतदारसंघांतील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका घेता आल्या नव्हत्या. नियमानुसार, संबंधित मतदारसंघात किमान ७५ टक्के मतदार (नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य इ.) उपलब्ध असणे आवश्यक असते. आता निवडणुका पार पडल्याने ही कायदेशीर अट पूर्ण झाली असून, निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाण्याची चिन्हे आहेत.


या जिल्ह्यांत होणार रणसंग्राम

  • पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर

  • अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, पुणे

  • सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया

  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

  • परभणी-हिंगोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड आणि छत्रपती संभाजीनगर-जालना.




राजकीय गणिते बदलणार!

विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्यांपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून येतात. सध्या त्यातील १७ जागा रिक्त आहेत. या १७ जागांच्या निकालाचा थेट परिणाम विधान परिषदेतील पक्षीय बलाबलावर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पक्षाचे वर्चस्व राहिले आहे, त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी नवे सदस्य निवडून आल्यास सभागृहात आपली ताकद वाढवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, अनेक दिग्गज नेते आणि इच्छुकांनी आतापासूनच पक्षश्रेष्ठीं घरच्या वाऱ्या सुरू केल्या असून, काही मतदारसंघांत उमेदवारीवरून अंतर्गत चुरस निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.