भारत आणि इटलीमधील संबंधांनी आता एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात रोम येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना अधिकृतपणे ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा दिला आहे. या निर्णयामुळे भारत-इटली संबंध अधिक मजबूत आणि भविष्याभिमुख होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (India - Italy Relations)
२२ अब्ज युरो व्यापाराचे मोठे लक्ष्य :
तंत्रज्ञान, AI आणि अंतराळ क्षेत्रात मोठे सहकार्य :
भारत आणि इटली यांच्यातील भविष्यातील भागीदारीचा केंद्रबिंदू तंत्रज्ञान असणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), क्वांटम तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि नागरी अणुऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. (India - Italy Relations)
याच पार्श्वभूमीवर ‘भारत-इटली इनोव्हेशन सेंटर’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांतील स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि उद्योगांना एकत्रित काम करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. (India - Italy Relations)
दहशतवादाविरोधात संयुक्त भूमिका :
८०० हून अधिक इटालियन कंपन्यांचा भारतात सहभाग :
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की ८०० हून अधिक इटालियन कंपन्या भारताच्या विकासात सक्रिय योगदान देत आहेत. भारत-इटली संयुक्त सामरिक कृती योजना २०२५-२०२९ ही दोन्ही देशांच्या संबंधांना व्यावहारिक आणि भविष्याभिमुख दिशा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.