BJP : केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त भाजपचे महासंपर्क अभियान

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष देशभरात महिनाभर व्यापक जनसंपर्क मोहीम राबविणार आहे. हा उपक्रम ९ जूनपासून सुरू होऊन ९ जुलैपर्यंत चालणार आहे. पक्षाने या राष्ट्रव्यापी मोहिमेसाठी '१२ वर्षे, १२ मोठ्या कामगिरी' ही संकल्पना निश्चित केली आहे.


या मोहिमेदरम्यान केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी जाहीर सभा, पत्रकार परिषदा, आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या मोहिमेत अगदी बूथ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग निश्चित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) नुकत्याच राबवलेल्या गृहसंपर्क मोहिमेच्या धर्तीवरच भाजप हा उपक्रम चालवणार आहे.


प्रत्येक बूथ पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन


या मोहिमेदरम्यान गावे, वस्त्या आणि शहरी वसाहतींमध्ये 'विकसित भारत संकल्प सभा' आयोजित केल्या जातील. यामध्ये सरकारने घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे झालेले सकारात्मक परिणाम जनतेसमोर मांडले जातील. प्रत्येक बूथ क्षेत्रात कार्यक्रम आयोजित करणे आणि 'पन्ना प्रमुख' यांनी आपापल्या भागातील मतदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधणे, असे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना कामाला लावणे, या दृष्टीने भाजप या मोहिमेकडे पाहत आहे.


मंत्रालयांकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने सर्व मंत्रालयांना त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख कामगिरीवर आधारित सविस्तर अहवाल आणि लहान माहितीपुस्तिका तयार करण्यास सांगितले आहे, ज्या सर्वसामान्यांमध्ये वाटल्या जातील. याशिवाय एक मुख्य पुस्तिका देखील तयार केली जात आहे, ज्यामध्ये सरकारच्या मोठ्या यशाचा समावेश असेल.


या मुद्द्यांवर भर
कलम ३७० हटवणे आणि सर्जिकल स्ट्राईक
बालाकोट एअर स्ट्राईक आणि नक्षलवादावरील कडक कारवाई
डिजिटल इंडिया, जीएसटी सुधारणा आणि पायाभूत सुविधांचा विस्तार
किसान सन्मान निधी, लखपती दीदी योजना आणि कोव्हिड व्यवस्थापन व लसीकरण मोहीम
संरक्षण उत्पादनांचे स्वदेशीकरण
अयोध्येतील राम मंदिर निर्मिती आणि 'ऑपरेशन सिंदूर'
या सर्व महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि जनकल्याणकारी निर्णयांना या देशव्यापी महासंपर्क मोहिमेचा मुख्य भाग बनवले जाणार आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख